Tuesday, July 21, 2026
Homeभंडारादुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणाला चारचाकी वाहनाने नेले फरफटत; तरुणाचा करून अंत..

दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणाला चारचाकी वाहनाने नेले फरफटत; तरुणाचा करून अंत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्याजवळ काल गुरुवारच्या रात्री भीषण अपघाताची घटना घडून एका ३२ वर्षीय तरुणाचा करून अंत झाला.अक्षय मधू नान्हे वय ३२ वर्षे,रा.नेरला,ता.पवनी,जि.भंडारा असे मृतक तरुणाचे नाव असून तो दुचाकीचा पेट्रोल संपल्याने दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभा असतांनाच सदरची घटना घडली.
पवनी तालुक्याच्या अड्याळ गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरला येथील अक्षय नान्हे हा काल गुरुवारच्या रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान दुचाकीचे पेट्रोल संपल्याने अड्याळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्याजवळील रस्त्याच्या कडेला उभा होता. अक्षय सोबत एक सहकारी असल्याने त्याला पेट्रोल आणण्यासाठी जवळच्या पंपावर पाठवले होते.या दरम्यान,विरूध्द दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने अक्षयला जोरदार धडक देऊन दुचाकीसह काही अंतरापर्यंत फरफटत नेले.यात अक्षयला गंभीर मार लागला.अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अक्षयला तात्काळ अड्याळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र,रात्रीच उपचार सुरू असतांनाच अक्षयची प्राणज्योत मालवली.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!