Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीतूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ ही राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारी महत्त्वाची योजना आहे.या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असून कृषी उत्पादनवाढीसाठी विविध घटकांचा लाभ मिळविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरणासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंतचे बियाणे असल्यास बियाणे किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये, तर तीन वर्षांपेक्षा अधिक व पाच वर्षांपर्यंतचे बियाणे असल्यास बियाणे किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ३ हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २० जून २०२६ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.अर्जासाठी शेतकऱ्यांकडे आधार संलग्न फॉर्मर आयडी असणे आवश्यक आहे.अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टलमार्फत सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य(FCFS) या तत्त्वाचाही अवलंब करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या लाभार्थ्यांना अधिकृत विक्रेत्यांमार्फत बियाण्यांचे वितरण करण्यात येईल.बियाणे पुरवठादार संस्थेच्या विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष ओळख पडताळूनच लाभ दिला जाणार आहे.तसेच एका शेतकऱ्याला या घटकांतर्गत कमाल दोन हेक्टर क्षेत्रासाठीच लाभ अनुज्ञेय राहणार आहे. यापूर्वी या घटकांतर्गत अनुदानाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील दोन वर्षे या योजनेसाठी पात्रता राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन दर्जेदार तूर बियाण्यांचा वापर करून उत्पादनवाढ साधावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!