Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंज'तप्ती-जलती घमोरियो में' देसाईगंज वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली? - गावे,शहरे...

‘तप्ती-जलती घमोरियो में’ देसाईगंज वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली? – गावे,शहरे भट्टीसारखी तापत असतांना वेजेचा लपंडाव..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-यंदा एप्रिल महिन्यातच दिवसागणिक उन्हाची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे.तीव्र उन्हाचा आरोग्याला फटका बसत आहे. वातावरणात उष्मा वाढू लागल्याने भर दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट असतो.प्रत्येकजण उन्हापासून बचाव करण्यासाठी थंडगार सावलीचा आसरा शोधत आहेत.नागरिक उकाड्याने हैराण झाल्याने घरातील कूलर,पंखे गरगर फिरू लागले आहेत.अशातच गावे,शहरे भट्टीसारखी तापत असतांना दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासारखी बत्ती गुल होऊ लागल्याने ‘तप्ती-जलती घमोरियो में’ देसाईगंज वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवावर उठली की काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.सूर्यनारायण वर येऊ लागला की,सकाळी ९ ते १० वाजल्यापासून उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण होऊ लागले आहेत.ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे शेतकरी व मजूर हे सकाळच्या सुमारास कामधंद्यांना प्राधान्य देत आहेत.दुपारी उन्हाचा पारा चढत असल्याने घरातील कूलर,पंखे सुरू ठेऊन गर्मी पासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशातच कधी भर दुपारीच तर कधी अर्ध्या रात्रीच बत्ती गुल होत असल्याने ‘हिट यार,हाय गर्मी’ असे म्हणावे लागत आहे.त्यामुळे देसाईगंज वीज पुरवठा कंपनीने थोडा तरी जनतेचा विचार करावा व विजेचा लपंडाव बंद करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!