उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात बऱ्याच दिवसांपासून उष्णतेत लक्षणीय वाढ झाली आहे.सूर्यदेवता जणूकाही मनुष्य प्राणीमात्रांवर कोपला की काय? असे हल्ली सर्वत्र दिसून येत आहे.एप्रिल महिन्यामध्येच एकदम कडक उन्ह तापू लागल्याने जीव कासावीस होऊ लागला आहे.सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने प्रशासनाच्या वतीने उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.अशातच ग्रामीण भागात लहान मुले-मुली उन्हा-तान्हात खेळत असतात.अश्याच प्रकारे गुरुवार २४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या वर्गात शिकत असलेली चिमुकली सकाळच्या शाळेतून घरी आल्यानंतर दिवसभर उन्हामध्ये खेळत होती.उन्हामध्ये खेळत असतांना अचानकपणे तिला चक्कर आला.चक्कर येऊन ती खाली कोसळली.खाली कोसळताच जागीच गतप्राण झाली.सदरची घटना यवतमाळ जिल्ह्यातील चिखलदरा पोड येथे घडली असून सोनाश्री विठ्ठल भुरकुटे वय ७ वर्षे असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचे नाव आहे.घटनेच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ अंशावर गेला होता.दिवसभर कडक उन्ह तापत असतांनाच चिमुकली उन्हात खेळली,त्यामुळेच तिचा मृत्यू झाला.उष्णतेत वाढ झाली असल्याने प्रथमतः लहान मुलांची कुटुंबीयांनी काळजी घ्यावी व स्वताच्याही शरीर सुदृढतेकडे लक्ष घालावे.
जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा उष्माघाताने मृत्यू…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

