Friday, July 17, 2026
Homeचंद्रपूरचारचाकी वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार

चारचाकी वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चारचाकी वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना आज ७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील झरण गावाजवळ घडली आहे.

सदर घटना झरण गावाच्या अगदी जवळ घडली असून जंगल परिसरातून बिबट्या रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाची बिबट्याला जोरदार धडक बसली.जोरदार धडक बसताच बिबट्या जागीच ठार झाला.सदर घटनेची माहिती वनविभागास मिळताच वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या व इतर वन्य प्राण्यांचे अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.त्यामुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!