- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-नुकतेच मंगळवार,१० मार्च रोजी जंगल परिसरात सरपण गोळा करीत असतांना वाघाने हल्ला चढवून एका इसमास ठार केल्याची घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंद्रपूर बफर वनपरिक्षेत्रातील मामला बीटाच्या कक्ष क्रमांक-३८४ मध्ये घडली होती.या हल्ल्यात जगन महासिंग धुर्वे वय ५० वर्षे,रा.मामला, ता.जि.चंद्रपूर यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच अवघ्या सहा दिवसांवर परत वाघाने झडप घालून एका २१ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची घटना काल,सोमवार १६ मार्चच्या दुपारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील चकनिंबाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-३७७ मध्ये घडल्याने परिसरातील गावांमध्ये वाघाची प्रचंड दहशत पसरून नागरिक भयभीत झाले आहेत.करण किसन शेडमाके २१ वर्षे,रा.निंबाळा,ता.जि.चंद्रपूर असे वाघाने ठार केलेल्या तरुणाचे नाव असून करण काल सोमवारी जनावरे घेऊन चकनिंबाळा शेतशिवारात गेला होता. दरम्यान,दुपारी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक जनावरांवर हल्ला चढवला.जनावरे जोरजोराने ओरडू लागल्याने करणने धाव घेत वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.मात्र,वाघ चवताळलेला असल्याने जनावरांना सोडून थेट करणच्या अंगावर
झडप घातली.यात करणचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक उपवसंरक्षक साकेत वाटोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी आपल्या वन विभागाच्या पथकासह घटनास्थळ गाठले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.वाघांच्या हल्ल्यांमुळे लोकांचे जिने हराम झाले असून वन विभाग ठोस उपाययोजना करण्यात फोल ठरत आहे.
- Advertisement -

