Tuesday, August 11, 2026
Homeदेसाईगंजग्रामीण भागात स्वच्छतेचे तीन-तेरा…-केवळ  'आम् भरो पोट भरो' बांधकामांकडे सर्वांचे लक्ष

ग्रामीण भागात स्वच्छतेचे तीन-तेरा…-केवळ  ‘आम् भरो पोट भरो’ बांधकामांकडे सर्वांचे लक्ष

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत प्राप्त निधीतून अनेक गावात सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्याकरिता सिमेंट नाल्यांची निर्मिती करण्यात आली.मात्र,सदर नाल्यांची नियमित सफाई केली जात नसल्याचा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.अशातच सार्वजनिक शौचालय यांच्या अवती भवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.कचरा कुंड्या तसेच इतर साधन केवळ नामधारी असल्याचे दिसून येत असूनही ग्रामपंचायत प्रशासन गाढ झोपेत असल्याने याचे नवल वाटत आहे.काही अंशी पावसाळ्यात नाल्यांचे पाणी प्रवाहित होते.मात्र, इतर दिवसांमध्ये नाल्यात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.नाल्या कचरा,सांडपाणी यांनी तुंबलेल्या अवस्थेत आहेत.घराच्या परिसरात तसेच वस्त्यातील नाल्यांची दुर्गंधी आणि डासाच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.वस्तीतील सांडपाणी वाहणाऱ्या मोरी बांधकामांची साफसफाई नेहमीच करवून घेणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असते. मात्र,त्याकडे संबंधित पदाधिकारी दुर्लक्ष करतात.तालुक्यातील काही गावांमधील रस्त्यांची समस्या मोठी गंभीर स्वरुपाची आहे.अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दैनावस्था होऊन त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.गावामधील अंतर्गत रस्तेही उखडून मार्गा वरील गिट्टी डोके वर काढू पाहत आहे.

यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पूर्वी प्रत्येक खेड्यात नागरिक पिण्याचे पाणी विहिरीचेच उपयोगात आणले जायचे; मात्र,जलवायू प्रदूषणामुळे विहिरीचे पाणी पिण्यायोग्य न राहता दूषित झाले आहे.यावर ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करून केवळ ‘आम् भरो पोट भरो’ बांधकामांकडे लक्ष घालतांना दिसून येत आहे.महत्वाचे म्हणजे सर्वांची टक्केवारी ही पूर्वनियोजित असल्याचे काही जणांच्या तोंडून ऐकले जात आहे.टक्केवारी नाही तर काम आणि दाम नाही असे बऱ्याच ठिकाणी सुरू असल्याने यावर आवर घालण्यासाठी पुढे धजावणार कोण? असा सवाल सगळ्यांकडून उपस्थित केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!