Monday, December 15, 2025
Homeदेसाईगंजकृषीपंप धारकांना २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत करा - देसाईगंज तालुका काँग्रेस...

कृषीपंप धारकांना २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत करा – देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन सादर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांना नियमित २४ तास विद्युत पुरवठा करण्याबाबत देसाईगंज तहसीलदार यांच्यामार्फतीन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.देसाईगंज तालुक्यातील नागरिकांची उपजीविका धान पिकावर अवलंबून असून मागील वर्षाच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधा भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली आहे.शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठ्याची अत्यंत गरज असतांना महावितरण कंपनीने ८ तास विद्युत पुरवठा केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान पीक नष्ट होण्याची शक्यता बळावली आहे.तालुक्यातील कृषी पंपांना २४ तास नियमित वीज पुरवठा तात्काळ करण्यात यावा; असे निवेदन सादर करण्यात आले.  

निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,तालुका उपाध्यक्ष संजय करांकर,पोटगाव गावचे माजी उपसरपंच नरेंद्र गजपुरे,तालुका महासचिव मनोहर नीमजे,ओबीसी तालुकाध्यक्ष अरुण कुंभलवार,तालुका युवक काँग्रेस कमिटी देसाईगंज अध्यक्ष पंकज चहांदे,जिल्ह्याचे ओबीसी काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव मनोज ढोरे,देसाईगंज तालुका सचिव जगदीश शेंद्रे,तालुका सचिव महेंद्र खरकाटे,तालुका सहसचिव अतुल मेश्राम,सागर बनसोड,धनदेव सोनबावणे व तालुक्यातील मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!