उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांना नियमित २४ तास विद्युत पुरवठा करण्याबाबत देसाईगंज तहसीलदार यांच्यामार्फतीन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.देसाईगंज तालुक्यातील नागरिकांची उपजीविका धान पिकावर अवलंबून असून मागील वर्षाच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधा भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली आहे.शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठ्याची अत्यंत गरज असतांना महावितरण कंपनीने ८ तास विद्युत पुरवठा केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान पीक नष्ट होण्याची शक्यता बळावली आहे.तालुक्यातील कृषी पंपांना २४ तास नियमित वीज पुरवठा तात्काळ करण्यात यावा; असे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,तालुका उपाध्यक्ष संजय करांकर,पोटगाव गावचे माजी उपसरपंच नरेंद्र गजपुरे,तालुका महासचिव मनोहर नीमजे,ओबीसी तालुकाध्यक्ष अरुण कुंभलवार,तालुका युवक काँग्रेस कमिटी देसाईगंज अध्यक्ष पंकज चहांदे,जिल्ह्याचे ओबीसी काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव मनोज ढोरे,देसाईगंज तालुका सचिव जगदीश शेंद्रे,तालुका सचिव महेंद्र खरकाटे,तालुका सहसचिव अतुल मेश्राम,सागर बनसोड,धनदेव सोनबावणे व तालुक्यातील मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.