Friday, November 7, 2025
Homeदेसाईगंजएक महिना लोटूनही चौकशीचा थांगपत्ताच लागेना....!- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचाराचे प्रकरण....-...

एक महिना लोटूनही चौकशीचा थांगपत्ताच लागेना….!- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचाराचे प्रकरण….- येत्या तीन दिवसांत वरिष्ठांकडे सत्यवान रामटेके  तक्रार करणार दाखल…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- ‘बोले तैसा चाले; त्याची वंदावी पाऊले’ अशा संतांच्या म्हणी प्रमाणे सत्यवान रामटेके यांनी प्रत्यक्षात कृती करून दाखवूनही समोरील अधिकारी व कर्मचारी यांना अजूनही चोलर शाहीच वाटत असल्याचा हल्ली प्रकार देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी निदर्शनास येऊ लागला आहे. 

सत्यवान रामटेके यांनी दिनांक-२० एप्रिल २०२३ रोजी देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या संपूर्ण कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यासंबंधाने विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांना तक्रार दाखल केली होती.तक्रारीत येत्या सात दिवसांत कुठल्याही प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार कारवाई वा चौकशी न झाल्याने २ मे २०२३ रोजी रामटेके यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता.उपोषण सुरू असतांनाच त्याच दिवशी लिखित मागण्या मंजूर झाल्याने आमरण उपोषण मागे घेण्यात आला. लिखित मागण्यामध्ये ९ मे २०२३ रोजी सदर प्रकरणी चौकशी समिती गठीत करून रामटेके यांना सदर समितीचे सदस्य ठेवण्यात आले होते.चौकशी समिती गठीत तर करण्यात आली.मात्र ज्या विभागाची तक्रार करण्यात आली होती; त्याच विभागाचे सर्व समितीमध्ये ठेवण्यात आल्याने १७ मे २०२३ रोजी आक्षेप घेण्यात आला.

महत्वाचे म्हणजे गठीत करण्यात आलेली समिती; ही केवळ चार भिंतींमध्येच थाथुर-मातुर चौकशी करीत असल्याचा आरोप रामटेके यांनी केल्याने गठित समिती रद्द करण्यात आली.त्यानुसार देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांना त्याच दिवशी पत्रानिशी कळविण्यात आले होते. पत्रानिशी कळविण्यात येऊनही अजून पावेतो चौकशी समिती वा चौकशीचा थांगपत्ताच लागेनास झाला आहे.त्यामुळे येत्या तीन दिवसांत नव्याने चौकशी समिती गठीत न झाल्यास व कुठल्याही प्रकारच्या कारवाईचे संकेत न दिसल्यास ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या व नव्याने करण्यात आलेल्या लागवड राज्य योजनेच्या संपूर्ण कामांवरील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडून मुख्य प्रधान सचिव पुणे,अप्पर प्रधान सचिव पुणे व वनसंरक्षक नागपूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठांना पत्ररुपी तक्रार तीन दिवसांत करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!