Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीआरमोरी शहरवासी तीन दिवसांपासून तहानलेलेच…-शहरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती…

आरमोरी शहरवासी तीन दिवसांपासून तहानलेलेच…-शहरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- आरमोरी येथील वैनगंगा नदीवरून आरमोरी शहराला पाणीपुरवठा केला जातो.मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या मशीन जळाल्याने आरमोरी शहराचा पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून ठप्प पडला आहे.त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

आरमोरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सयंत्रणेत दर महिन्याला बिघाड येत असतो.कमी जास्त विजेच्या दाबामुळे पाणीपुरवठा करणा-या सयंत्रणेत बिघाड ही नित्याचीच बाब बनली आहे.सध्या आरमोरी शहराला नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी शहराचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. एका भागामध्ये सकाळी तर दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी अशाप्रकारे एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.यामुळे दररोज शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

अशात पाणीपुरवठा करणाऱ्या मशीन जळाल्याने तीन दिवसांपासून शहरवासीयांना पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहे.वैनगंगा नदीवरील वीज ही मागील अनेक वर्षांपासून सिंगल फेजद्वारा चालत आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण कार्यालयातून वारंवार विजेचा लपंडाव होत असल्याने जलकुंभात पूर्णपणे पाण्याचा साठा होत नाही.वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या सयंत्रात दर महिन्याला बिघाड येत असल्याने आरमोरीकरांना महिन्यातून दहाच दिवस पाणी मिळते.परंतु नगर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!