Tuesday, June 23, 2026
Homeआरमोरीआरमोरी शहरवासी तीन दिवसांपासून तहानलेलेच…-शहरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती…

आरमोरी शहरवासी तीन दिवसांपासून तहानलेलेच…-शहरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- आरमोरी येथील वैनगंगा नदीवरून आरमोरी शहराला पाणीपुरवठा केला जातो.मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या मशीन जळाल्याने आरमोरी शहराचा पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून ठप्प पडला आहे.त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

आरमोरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सयंत्रणेत दर महिन्याला बिघाड येत असतो.कमी जास्त विजेच्या दाबामुळे पाणीपुरवठा करणा-या सयंत्रणेत बिघाड ही नित्याचीच बाब बनली आहे.सध्या आरमोरी शहराला नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी शहराचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. एका भागामध्ये सकाळी तर दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी अशाप्रकारे एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.यामुळे दररोज शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

अशात पाणीपुरवठा करणाऱ्या मशीन जळाल्याने तीन दिवसांपासून शहरवासीयांना पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहे.वैनगंगा नदीवरील वीज ही मागील अनेक वर्षांपासून सिंगल फेजद्वारा चालत आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण कार्यालयातून वारंवार विजेचा लपंडाव होत असल्याने जलकुंभात पूर्णपणे पाण्याचा साठा होत नाही.वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या सयंत्रात दर महिन्याला बिघाड येत असल्याने आरमोरीकरांना महिन्यातून दहाच दिवस पाणी मिळते.परंतु नगर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!