उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रेती तस्करीला उधाण आले आहे.अशातच आता अनेक विभागातील शासकीय कर्मचारी १४ मार्च पासून बेमुदत संपावर गेले असल्याने सर्व कार्यालयांत शुकशुकाट पहावयास मिळतो आहे.कार्यालयातील मनुष्यबळ कमी झाला आहे.तसेच वरिष्ठ अधिकारी यांची कार्यालयांमध्ये उपस्थिती दिसून येत आहे.मात्र महसूल विभागातील कर्मचारीही संपावर गेल्याने शासकीय कामांना खीळ बसली आहे.त्यामुळे आता रेती चोरांची मजाच-मजा असणार आहे.साहजिकच संपामुळे रेती चोरी करणाऱ्यांकडे लक्ष नसण्याची स्थिती निर्माण झाली असल्याने रेती चोरांना सुगीचे दिवस येणार आहेत.
अशातच आता संपाचा काळ रेती चोरांसाठी पर्वणीचा व फलदायी ठरणार,असे दिसून येत आहे.
.

