Wednesday, July 15, 2026
Homeमुंबईआज होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट; आरोप-प्रत्यारोपांची मालिका..

आज होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट; आरोप-प्रत्यारोपांची मालिका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज,बुधवार २५ मार्च २०२६ रोजी शेवटचा दिवस असून मागील महिन्याच्या २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला होता.आजच्या अंतिम दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून,नाशिकमधील खरात प्रकरण आणि अजित पवारांच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असून सभागृहात कामकाजाचा तुफान धडाका पाहायला मिळणार आहे.सभागृहात विविध शासकीय व अशासकीय विषयांवर चर्चा रंगणार असून, सदस्यांकडून लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार आहेत.त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे,सदरचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडले.काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी देशातील इंधन टंचाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाच्या तोंडावर इस्त्रायलच्या दौऱ्यावर जाण्याची काहीच गरज नव्हती.देशाच्या नेतृत्वाच्या चुकीमुळे आज सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. देशात कोरोना महामारीच्या काळासारखी स्थिती उद्धवण्याची शक्यता असून,इंधन तुटवड्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील,असे ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधतांना म्हणालेत.अश्यातच आज शेवटच्या दिवशी अंतिम आठ प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना...

मधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 'मध...

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!