- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज संपूर्ण देश प्रकाशोत्सव साजरा करत असतांनाच,छत्तीसगडच्या गरियाबंद येथील उदंती क्षेत्र समितीतील सक्रिय नक्षलवादी(माओवादी)त्यांचा वर्षानुवर्षे चाललेला सशस्त्र संघर्ष संपवून नव्या जीवनाकडे वाटचाल सुरू करणार आहेत.महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोलीत नक्षली नेता भूपतीने ६१ साथीदारांसह आत्मसमर्पण केल्यानंतर आणि छतीसगडच्या बस्तरमध्ये २१० नक्षलवाद्यांसह
रूपेशने आत्मसमर्पण केल्यानंतर सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.अनेक नक्षलींनी लाल दहशत सोडून संविधान स्विकारण्याची तयारी दर्शविली आहे.अश्यातच गडचिरोली,बस्तर येथील सामूहिक आत्मसमर्पणानंतर, उदंती पथकानेही सशस्त्र संघर्ष सोडण्याचा निर्णय घेतला,ज्यामुळे छत्तीसगडमध्ये शांततेची आशा निर्माण झाली आहे.आज,सोमवार २० ऑक्टोंबरला शेकडो नक्षलवादी शरण येणार आहेत.
नक्षलवादी सुनीलने जारी केलेल्या अपील पत्रानुसार, समितीने २० तारखेपासूनच आत्मसमर्पण प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.या पत्रात स्पष्टपणे उर्वरित तुकड्यांना सोमवारी दुपारी १२:३० वाजता सशस्त्र चळवळ थांबवण्यासाठी भेटण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सुनीलचे आवाहन संघटनेतील उदास वातावरण स्पष्टपणे प्रतिबिंबित करते.आपल्या मुद्द्याला महत्त्व देण्यासाठी,त्याने आपल्या साथीदारांना सांगितले, “प्रथम आपल्याला टिकून राहावे लागेल,आणि नंतर आपण संघर्ष सुरू ठेवू शकतो.” सुनीलने मान्य केले की,केंद्रीय नेतृत्व (केंद्रीय समिती)वेळेवर निर्णय घेण्यात अपयशी ठरले आणि त्यांनी अनेक महत्त्वाचे सहकारी गमावले आहेत.
- Advertisement -

