- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिवाळीचा सण लख्ख प्रकाशाचा, आनंदाचा तितकाच काळजीपूर्वक साजरा करण्याचा आहे.घराघरांत फराळाची चव,आकाशकंदिलांची झगमग आणि फटाक्यांच्या आवाजात हरवलेली संध्याकाळ या सगळ्या आनंदात एक बाब अनेकदा दुर्लक्षित राहते,ती म्हणजे डोळ्यांची सुरक्षितता.दरवर्षी फटाक्यांमुळे हजारो लोक डोळ्यांची दुखापत होऊन दृष्टी गमावतात आणि हा आनंदाचा सण दुःखात परिवर्तीत होतो.एक क्षणाची चूक, आयुष्यभराचा अंधार होतो.त्यामुळेच वरिष्ठ नेत्ररोग तज्ञांनी काही महत्त्वाचे ‘डोळस’ सल्ले देत डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.फटाक्यांच्या दुखापतींमुळे होणारे अंधत्व ही एक जागतिक समस्या आहे.फटाक्यांत चारकोल,गंधक,नायट्रेट,क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात.या घटकाचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो.फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना, तसेच त्वचेला अपायकारक असतो.दमा व ॲलर्जीचे वाढते.फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण,जलप्रदूषण,वायुप्रदूषण व सामाजिक प्रदूषण होते.फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० डिग्रीपर्यंत वाढते.नेत्ररोग तज्ज्ञानुसार,फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना याची जास्त इजा होते.कारण,स्फोटामुळे दगड,माती वेगाने उडते व डोळ्याला व इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्यांत जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व व गंभीर दुखापतींमुळे डोळा गमवावा लागू शकतो.बारुदमुळे डोळ्यांना रासायनिक इजा होऊ शकते.अनार,सुतळी बॉम्ब,चक्री आणि रॉकेट यांसारख्या फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका सर्वाधिक असतो.फटाक्यांची लळी,पायली फोडतांना जमिनीवरील बारीक खट्टे वेगाने डोळ्यांत जाण्याची भीती असते. विशेष म्हणजे,सुतळी बॉम्ब सारख्या फटाक्यांवर मातीचे मडके ठेवून फोडले जातात.यामुळे मडक्याचे बारीक कण डोळ्यात खुपसण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे हे टाळणे गरजेचे आहे.फटाक्यांमुळे डोळा लाल होणे,पाणी जाणे,डोळा दुखणे,अचानक डोळ्याची नजर कमी होणे, उजेड सहन न होणे,डोके दुखणे,डोळ्यात चिपड येणे, डोळे सुजणे इत्यादी परिणाम दिसून आल्यास याकडे दुर्लक्ष करू नये.
- Advertisement -

