Saturday, June 20, 2026
Homeनवी दिल्लीअरविंद केजरीवालांनी जनतेला दिल्या १० गॅरंटी...- देशात २४ तास विजेची व्यवस्था;गरिबांना मोफत वीज;...

अरविंद केजरीवालांनी जनतेला दिल्या १० गॅरंटी…- देशात २४ तास विजेची व्यवस्था;गरिबांना मोफत वीज; शेतमालाला हमीभाव व इतर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने आज रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला.आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

मोदींनी दिलेल्या जुन्या आश्वासनांवर जोर देत

केजरीवाल म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात

१५ लाख टाकणार होते,पण तसे झाले नाही.२ कोटी

रोजगार देणार होते,पण तसेही झाली नाही.२०२२

पर्यंत बुलेट ट्रेन चालवण्याच्या बाता मारत होते, पण

अद्याप तसे झालेले नाही. मात्र आम्ही मोफत वीज,

चांगले शिक्षण, मोहल्ला क्लिनीकचे आश्वासन दिले

आणि पूर्णही केले. मोदींची गॅरंटी कोण पूर्ण करणार

माहिती नाही.कारण ते आता ७५ वर्षांचे होणार

असून त्यांनीच बनवलेल्या नियमाप्रमाणे निवृत्त

होतील.परंतु केजरीवाल यांची गॅरंटी केजरीवालच

पूर्ण करेल.एखाद्या देशामध्ये लाखो लोकं अशिक्षित असतील,शिक्षण व्यवस्था चांगली नसेल तर देशाचा विकास होणारच नाही.देशातील जनतेचे आरोग्य चांगले राहिले तरच देशाचा विकास होईल.आज देशातील सरकारी रुग्णालयांची परिस्थिती बिकट आहे.त्यामुळे देशात प्रत्येक गल्लीत मोहल्ला क्लिनिक

सुरू केले जाईल,असे म्हणत केजरीवाल यांनी देशाला १० आश्वासने दिली.

१. देशात २४ तास विजेची व्यवस्था करणार आणि गरिबांना मोफत वीज देणार

२. प्रत्येक गावात, मोहल्ल्यात चांगल्या शाळा उभारणार.देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला चांगले आणि मोफत शिक्षण मिळण्याची व्यवस्था करणार

३. प्रत्येक गावात,गल्लीत मोहल्ला क्लिनीक उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

४. राष्ट्र सर्वप्रथम – लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देणार आणि चीनच्या ताब्यात गेलेली जमीन सोडवणार

५. अग्निवीर योजना लष्करासाठी घातक असून ही योजना बंद करणार. अग्निवीर योजनेद्वारे भरती झालेल्यांना पक्की नोकरी देणार

६. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला हमीभाव देणार

७. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार

८. एका वर्षात दोन कोटी रोजगार देण्याची व्यवस्था करणार

९. भाजपच्या वाशिंग मशीनला भर चौकात फोडणार आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करणार

१०. व्यापाऱ्यांसाठी जीएसटी प्रणाली अधिक सुकर करणार

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!