Wednesday, June 10, 2026
Homeमुंबईअखेर शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ..

अखेर शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ५६ लाखाहून अधिकच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे.आज, मंगळवार २ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली.या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.मात्र,राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णयाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही.कर्जमाफी संदर्भात सहकार विभागाकडून अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे.या अटी व शर्तीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती.या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केल्यानंतर आज मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.दोन लाखापर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार असून नियमित पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्सानपर निधी देखील दिला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!