Thursday, September 3, 2026
Homeनागपूरहत्या प्रकरणात निष्काळजीपणा; पोलीस उपनिरीक्षक निलंबित तर पाच पोलीस कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवली..

हत्या प्रकरणात निष्काळजीपणा; पोलीस उपनिरीक्षक निलंबित तर पाच पोलीस कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बारावीत असतांना दोघांची मैत्री होती.मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे तिने त्याच्याशी संपर्क तोडला. कारागृहाबाहेर आल्यानंतर तो तिला भेटायला गेला. मात्र,तिने त्याच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या गुन्हेगाराने तिच्या वडिलांचा चाकूने भोसकून दिवसाढवळ्या पोलीस चौकीसमोरच खून केल्याची घटना २६ मार्च २०२५ रोजी दुपारी २ च्या दरम्यान नागपूर शहराच्या इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी येथे घडली होती.नरेश वालदे वय ५५ वर्षे, इंदिरानगर,जाटतरोडी यांचा खून करण्यात आला होता.नीतेश ऊर्फ नाना विनोद मेश्राम वय ३५ वर्षे,रामबाग व ईश्वर ऊर्फ जॅकी सोमकुवर अशी आरोपींची होती.आरोपी नीतेशने खून केल्यानंतर फोटो घेतला व तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता व ‘बेबी,मी बघ काय केले आहे’ असे त्याने कॅप्शन लिहिले व तुटलेल्या हृदयाचे इमोजी टाकले होते.नीतेशच्या फ्रेंडलिस्टमधील काही जणांनी त्याला लाइकदेखील केले होते.त्याच्या या कृतीमुळे पोलिसदेखील काहीकाळ अवाक् झाले होते.
नीतेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.त्याने २०१९ साली एकाची हत्यादेखील केली होती.संबंधित तरुणीला नीतेश अनेक दिवसांपासून त्रास देत होता.अशातच आता
नरेश वालदे हत्या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या इमामवाडा पोलिस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.तर पाच कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबविण्यात आली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आलेली नाही,असा सवाल उपस्थित होत आहे.
२५ मार्च २०२५ च्या रात्री त्याने आणि त्याच्या साथीदारांनी वालदे यांना मारण्याच्या उद्देशाने घरावर हल्ला केला होता.वालदे घरी नसल्याने त्यांची बाइक खराब केली आणि निघून गेला.नितेश विरुद्ध आधीच खुनाचा गुन्हा दाखल होता.नितेश आणि त्याचा साथीदार कुख्यात गुन्हेगार असूनही,इमामवाडा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. वालदे यांनी संपूर्ण रात्र पोलिस स्टेशनमध्ये काढली होती.त्यांनी कर्मचाऱ्यांकडून मदत मागितली आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली.मात्र,डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.यामुळे आरोपींचे मनोबल वाढले आणि त्यांनी पोलिस चौकीसमोरच वालदेंची हत्या केली.उपायुक्त रश्मिता राव यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक आडे त्या दिवशी नाइट ड्युटीवर होते व त्यांनीच अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. गंभीर गुन्ह्यातील आरोपी असूनदेखील कारवाई न केल्याचा ठपका लावत आडे यांना निलंबित करण्यात आले आहे.तर पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील तीन कर्मचारी,बिट मार्शल्स व एका कर्मचाऱ्याची पगारवाढ थांबविण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!