Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशी कोणतीही योजना नाही..

सावधान..! ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशी कोणतीही योजना नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-सोशल मीडियाचे जाळे दूरवर पसरल्याने आज अनेकजण याचा वापर विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर करतांना दिसून येतात. मात्र,यातील काही बाबी खऱ्या असतात,तर काही बाबींची शहानिशा करणे गरजेचे असते.अन्यथा फसवणूक व विविध समस्यांना सामोरे जाऊन सर्वकाही गमावून बसण्याची वेळ येत असते.अश्याच प्रकारे काही कालावधीपासून सोशल मीडियाच्या विविध समाजमाध्यमांवर इयत्ता ५ वी ते १२ वी विद्यार्थ्यांना सूचना, ‘मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना’आपणा सर्वांना विनंती आहे की ०१ मार्च २०२० नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे.अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी ४०००/- दरमहा मिळणार आहेत.हा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्या.
कागदपत्रे –
१. बाळ आणि आई एकत्र खाते
२. शिधापत्रिका
३. आधार कार्ड (आई आणि मुलासाठी)
४. शाळेचे ओळखपत्र / मुख्याध्यापकांनी लिहिलेले
५. वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र
६. उत्पन्नाचा पुरावा (७२०००/७५०००)
फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट/जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा.
टीप – जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत.
अधिक माहिती साठी विद्यार्थ्यांनी ९६१५१५५००५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
अश्याप्रकारे एका कागदावर लिहिलेले आणि त्यावर सही,शिक्का असलेली माहिती सर्वत्र फिरू लागली आहे.मात्र,महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय(MAHARASHTRA DGIPR) यांनी याबाबत खुलासा सादर केला आहे.
समाजमाध्यमांवर ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने’बाबत पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाअंतर्गत ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही.त्यामुळे,व्हायरल झालेल्या पोस्टमधील सर्व दावे हे खोटे ठरतात.व्हायरल नोटीसवर कोल्हापूरच्या इचलकरंजी येथील वेंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांची स्वाक्षरी आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी हा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे; असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी म्हटले आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!