Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशी कोणतीही योजना नाही..

सावधान..! ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशी कोणतीही योजना नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-सोशल मीडियाचे जाळे दूरवर पसरल्याने आज अनेकजण याचा वापर विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर करतांना दिसून येतात. मात्र,यातील काही बाबी खऱ्या असतात,तर काही बाबींची शहानिशा करणे गरजेचे असते.अन्यथा फसवणूक व विविध समस्यांना सामोरे जाऊन सर्वकाही गमावून बसण्याची वेळ येत असते.अश्याच प्रकारे काही कालावधीपासून सोशल मीडियाच्या विविध समाजमाध्यमांवर इयत्ता ५ वी ते १२ वी विद्यार्थ्यांना सूचना, ‘मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना’आपणा सर्वांना विनंती आहे की ०१ मार्च २०२० नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे.अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी ४०००/- दरमहा मिळणार आहेत.हा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्या.
कागदपत्रे –
१. बाळ आणि आई एकत्र खाते
२. शिधापत्रिका
३. आधार कार्ड (आई आणि मुलासाठी)
४. शाळेचे ओळखपत्र / मुख्याध्यापकांनी लिहिलेले
५. वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र
६. उत्पन्नाचा पुरावा (७२०००/७५०००)
फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट/जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा.
टीप – जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत.
अधिक माहिती साठी विद्यार्थ्यांनी ९६१५१५५००५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
अश्याप्रकारे एका कागदावर लिहिलेले आणि त्यावर सही,शिक्का असलेली माहिती सर्वत्र फिरू लागली आहे.मात्र,महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय(MAHARASHTRA DGIPR) यांनी याबाबत खुलासा सादर केला आहे.
समाजमाध्यमांवर ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने’बाबत पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाअंतर्गत ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही.त्यामुळे,व्हायरल झालेल्या पोस्टमधील सर्व दावे हे खोटे ठरतात.व्हायरल नोटीसवर कोल्हापूरच्या इचलकरंजी येथील वेंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांची स्वाक्षरी आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी हा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे; असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी म्हटले आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!