- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय विभागा अंतर्गत संजय गांधी विभागात कार्यरत ४१९ आयटी असिस्टंटच्या मानधनात वाढ करण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी आयटी असिस्टंट कर्मचारी संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
राज्याच्या संजय गांधी विभागात आयटी असिस्टंट कर्मचारी हे २०१४ पासून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये संगणकीय तांत्रिक कार्य पार पाडत आहेत.अत्यल्प मानधन असूनही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीची माहिती अद्ययावत करणे,डीबीटी पोर्टल, एनसएपी व पीफएमस प्रणालीद्वारे पेंशन वितरण यासारखी महत्त्वाची कामे करीत आहेत.मात्र,गेल्या दहा वर्षांपासून मानधनात वाढ झालेली नाही.त्यामुळे सेवेला स्थैर्य,शासनमान्य वेतनश्रेणी,वार्षिक वेतनवाढ, सेवा सुरक्षा,भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय सुविधांचा समावेश,मानधन थेट शासन स्तरावरून वितरित करावे इत्यादी मागण्या मान्य करण्यात याव्यात,असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करतेवेळी अनिल उबाळे व किरणराज पंडित यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कंत्राटी आयटी असिस्टंट कर्मचारी संघटनेच्या ज्योती जाधव, योगिता चव्हाण,सीमा शरणागत,कृष्णा पवार,आमेर शेख,करण सोनवणे,पोपट जामकर,आसिफ पठाण आदी उपस्थित होते.
- Advertisement -

