Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त"शेतकरी नवरा नको गं बाई" म्हणणाऱ्यांना मुलाकडे शेती पाहिजे तरी कशाला?

“शेतकरी नवरा नको गं बाई” म्हणणाऱ्यांना मुलाकडे शेती पाहिजे तरी कशाला?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लग्नाची वय झाली,पण मुलगीच मिळेना..! अनेक तरुणांची वय घसरत चालली आहे.मुलीकडील घरच्यांच्या अपेक्षा वाढत असल्याने काय करावे? असा प्रश्न मुलाकडील घरच्यांना पडला आहे.अशातच आता शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे.यात आता ठराविक उत्पन्नाची हमी राहिली नाही.त्यामुळे शेतकरी नवरा नकोच,अशी धारणा होऊ लागल्याने शेती करणाऱ्या वराला आता मुलगी मिळणे कठीण झाले आहे.एकीकडे “शेतकरी नवरा नको गं बाई” म्हणणाऱ्या वधूला व वधूच्या नातेवाइकांना नोकरीवर असलेल्या मुलाकडे शेती पाहिजे तरी कशाला? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
पूर्वीच्या काळ बघितला तर ‘उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ असा समज होता.कालांतराने चक्रच बदलले आणि उत्तम नोकरी,तर कनिष्ठ शेती  ठरली आहे.या दहा वर्षाच्या काळात शेतीचे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत बरेच कमी झालेले आहे.उत्पन्न जरी सरासरी एवढेच होत असेल,तरी मिळणारा बाजार भाव व लागत मूल्य यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मिळणारा नफा हा फारच कमी असून, कधीकधी शेती तोट्यातही जाते.आजची परिस्थिती अशी आहे की,ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींनाही आज शहरात नोकरी करणारा मुलगा हवा आहे.मुंबई,पुणे यांसारख्या शहरात नोकरी असलेला,तसेच एक स्वतंत्र फ्लॅट असलेला मुलगा आज मुलींना हवा आहे.परंतु गावखेड्यातील शेतात राबणारा मुलगा मुलींना नकोसा झालेला आहे.शेतकरी मुलाला मुलगी दिल्यास आपली मुलगी सुखात राहणार नाही.उन्हातान्हात कामे करावी लागतील,या काळजीने पालकही मुलगी द्यायला तयार होत नाही.मात्र,नोकरी करणाऱ्या मुलाकडे शेती आहे की नाही हे विचारले जाते. जन्मदर तफावत व मुली उच्चशिक्षित असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!