Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त"शेतकरी नवरा नको गं बाई" म्हणणाऱ्यांना मुलाकडे शेती पाहिजे तरी कशाला?

“शेतकरी नवरा नको गं बाई” म्हणणाऱ्यांना मुलाकडे शेती पाहिजे तरी कशाला?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लग्नाची वय झाली,पण मुलगीच मिळेना..! अनेक तरुणांची वय घसरत चालली आहे.मुलीकडील घरच्यांच्या अपेक्षा वाढत असल्याने काय करावे? असा प्रश्न मुलाकडील घरच्यांना पडला आहे.अशातच आता शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे.यात आता ठराविक उत्पन्नाची हमी राहिली नाही.त्यामुळे शेतकरी नवरा नकोच,अशी धारणा होऊ लागल्याने शेती करणाऱ्या वराला आता मुलगी मिळणे कठीण झाले आहे.एकीकडे “शेतकरी नवरा नको गं बाई” म्हणणाऱ्या वधूला व वधूच्या नातेवाइकांना नोकरीवर असलेल्या मुलाकडे शेती पाहिजे तरी कशाला? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
पूर्वीच्या काळ बघितला तर ‘उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ असा समज होता.कालांतराने चक्रच बदलले आणि उत्तम नोकरी,तर कनिष्ठ शेती  ठरली आहे.या दहा वर्षाच्या काळात शेतीचे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत बरेच कमी झालेले आहे.उत्पन्न जरी सरासरी एवढेच होत असेल,तरी मिळणारा बाजार भाव व लागत मूल्य यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मिळणारा नफा हा फारच कमी असून, कधीकधी शेती तोट्यातही जाते.आजची परिस्थिती अशी आहे की,ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींनाही आज शहरात नोकरी करणारा मुलगा हवा आहे.मुंबई,पुणे यांसारख्या शहरात नोकरी असलेला,तसेच एक स्वतंत्र फ्लॅट असलेला मुलगा आज मुलींना हवा आहे.परंतु गावखेड्यातील शेतात राबणारा मुलगा मुलींना नकोसा झालेला आहे.शेतकरी मुलाला मुलगी दिल्यास आपली मुलगी सुखात राहणार नाही.उन्हातान्हात कामे करावी लागतील,या काळजीने पालकही मुलगी द्यायला तयार होत नाही.मात्र,नोकरी करणाऱ्या मुलाकडे शेती आहे की नाही हे विचारले जाते. जन्मदर तफावत व मुली उच्चशिक्षित असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!