Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजशेतकऱ्यांना लिंकिंग विरहित खताचा पुरवठा करा.. - शेतकरी उत्पादक कंपन्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे...

शेतकऱ्यांना लिंकिंग विरहित खताचा पुरवठा करा.. – शेतकरी उत्पादक कंपन्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या नेहमीच शेतकरी हितावह कार्ये करीत असून मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना वाजवी दरात तसेच लिंकिंग विरहित खताचा पुरवठा कंपन्यांकडून करण्यात येतो आहे. मात्र,चालू वर्षात जिल्हात खत उपलब्ध होण्यास उशीर झाल्याने मोठ्या प्रमाणात खत विक्रीमध्ये लिंकिंग होऊन प्रत्यक्ष शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा सहकारी संस्थांना खतपुरवठा न करता संपूर्ण खत व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वितरित करण्यात येत आहे.त्यामुळे खत विक्रीमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने, होणारी लूट थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना लिंकिंग विरहित खताचा पुरवठा करण्याकरीता रॅकमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना आरक्षित कोटा देण्यात यावा,अशी मागणी देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी,संचालक कैलास पारधी(मोहटोला) व जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वतीने गडचिरोली जिल्हाधिकारी अवीश्यांत पंडा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे,जिल्ह्यात खताचा पुरवठा करीत असतांना सहकारी संस्थांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांना रॅक मध्ये आरक्षित कोटा असणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या आणि हित जोपासणाऱ्या असून शेतीचे उत्पन्नवाढीसाठी नेहमी प्रयत्नशील असतात.त्यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खत पुरवठा होणे आवश्यक आहे.अश्यातच व्यापारी वर्गांना संपूर्ण खत पुरवठा करण्यात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार  असल्याची बाब सुनील पारधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये याकरीता लिंकिंग विरहित खताचा पुरवठा होणे गरजेचे असल्याने उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्यात यावे,असेही त्यांनी सांगितले.सोबतच याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनाही निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच जिल्ह्याचे गुण नियंत्रक तथा कृषीविकास अधिकारी पाल यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!