Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजशेतकरी बांधवांच्या शेतजमिनिंची मोजणी मोफत करून द्यावी - नरेश वासनिक यांची मागणी

शेतकरी बांधवांच्या शेतजमिनिंची मोजणी मोफत करून द्यावी – नरेश वासनिक यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- भारतहा कृषिप्रधान देश आहे.देशातील ७५% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकरी बांधवांना देशाचाच नाही तर जगाचा पोशिंदा म्हटले जाते.अशातच बरेच शेतकरी भाऊ हिष्याच्या कलहामुळे वा इतर घरगुती वादांमुळे बहुतांश शेतकरी शेतजमीनी पडीत ठेवतांना दिसून येत आहेत.मुख्यत्वे शेतकरी बांधवांना नेहमी आर्थिक अडचणींना सामोरेही जावे लागत आहे.यासाठी शासन स्तरावरून शेतकऱ्यांकरीता ठोस पावले उचलून शेतकरी बांधवांच्या शेतजमिनिंची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोफत करून द्यावी; अशी मागणी  समाजवादी पार्टीचे देसाईगंज शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी केली आहे.

गडचिरोली जिल्हा पाठोपाठ चंद्रपूर,भंडारा,गोंदिया अशी तीन जिल्हे लागून आहेत.चारही जिल्ह्यातील शेतकरी बांधव ८०% ते ९०% शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.सदर जिल्हे धान उत्पादनास प्रख्यात मानली जातात.शेतकरी बांधवांचा विकास व्हावा; या उद्देशाने शासन स्तरावरून अनेक योजना राबविल्या जातात.मात्र राबविण्यात येणाऱ्या योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसून येतात.शेतकरी वर्ग सततची नापिकी,दुष्काळ,किडीचा प्रादुर्भाव व इतर अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव कर्जबाजारी होऊन टोकाचे पाऊल घेत असतात.यासाठी शासन स्तरावरून ज्याप्रमाणे शेतकरी बांधव यांच्या करीता अनेक योजना राबविल्या जातात; तश्याच प्रकारची योजना अनुसुचित जाती,जमाती व खुल्या प्रवर्गा करीता महसूल विभागाच्या भूमी अभिलेख विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतजमिनिंची मोफत मोजणी करून देण्याची योजना राबविण्यात यावी; असे देसाईगंज समाजवादी पार्टीचे  शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!