Monday, July 27, 2026
Homeकोंढाळाव्यावहारीक ज्ञानासाठी बाल आनंद मेळावा महत्वपुर्ण-सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार - विद्या...

व्यावहारीक ज्ञानासाठी बाल आनंद मेळावा महत्वपुर्ण-सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार – विद्या निकेतन शाळा कोंढाळा येथे बाल आनंद मेळावा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-शिक्षणासोबतच मुलांना व्यावहारीक ज्ञानाची देखिल गरज आहे.दर्जेदार शिक्षणांसोबतच विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे काम होत आहे.विद्यार्थ्यांनी भरवलेला हा आनंद मेळावा सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार यांनी केले.देसाईगंज तालुक्याच्या विद्या निकेतन लोकमान्य टिळक विद्यालय कोंढाळा येथे नुकताच बाल आनंद मेळावा संपन्न झाला.प्रसंगी आयोजित मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार बोलत होते.
बाल आनंद मेळावा हा शैक्षणिक जिवणपटलावरील महत्वाचा घटक आहे.विद्यालयीन शिक्षण घेत असतांना व्यवसायाची सांगड घालून ज्ञानार्जन गिरविले पाहिजे. आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असल्याने शिक्षणासह इतरही पाया मजबूत करणे गरजेचे झाले आहे.त्यामुळे विद्यालयाने आयोजित केलेला बाल आनंद मेळावा कौतुकास्पद आहे.तसेच आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळत आहे.विद्यार्थिनींनी व्यवसायाची मांडणी, हिशोब,संवादकौशल्य यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला असल्याचेही प्रतिपादन कुंभलवार यांनी केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयानंद बुराडे,शाळेचे मुख्याध्यापक केशव देशमुख,पत्रकार
नितेश पाटील,शिक्षक हर्षे,शिक्षिका रीना कन्नाके, स्वाती ढोंगे,हर्षद कांबळी,मनोज तरवटकर,अशोक निंबुरकर,दिलीप पारधी,आशिष बुल्ले सह शिक्षक- पालक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!