Sunday, May 24, 2026
Homeनागपूरवाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची बालविवाहाच्या जोखडातून सुरक्षितरित्या सुटका केल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात उघडकीस आली.पथकाने संबंधित गावात जाऊन विवाह रोखण्याचा प्रयत्न केला असता नातेवाइकांनी ‘फक्त वाढदिवसाचा कार्यक्रम आहे,’ असा बनाव  केला.मात्र,सखोल पडताळणीत घरात हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याचे उघड झाले.स्वतः पीडित मुलीनेही नातेवाइकांच्या दबावामुळे हा विवाह होत असल्याचे जबाबात सांगितल्याने पोलिसांनी मुलीला सुरक्षित रेस्क्यू करून पुढील संरक्षण व समुपदेशनासाठी बालगृहात दाखल केले.विशेष म्हणजे,बाल संरक्षण समितीकडून कारवाई सुरू असतांना,गावातील एका स्वयंघोषित समाजसेविकेने यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी तात्काळ रामटेकचे तहसीलदार रमेश कोडापे यांच्याशी संपर्क साधून शासकीय यंत्रणा मिळवली व पुढील प्रक्रिया पार पाडली.सदरची कारवाई जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण,प्रसेनजित गायकवाड,साधना ठोंबरे, अनिकेत भिवगडे,मीनाक्षी धडाडे,प्रियंका होटे,पोलीस उपनिरीक्षक वर्षा गायकवाड,सरपंच वर्षा हट्टी,ग्राम अधिकारी करुणा महाले,पोलिस पाटील वैशाली सलामे व अंगणवाडी सेविका विजया कश्यप यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

उभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घालून घडलेल्या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २३...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!