Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरवाघोबाची झलक पहायची असेल तर किमान दोन महिने पाहावी लागणार वाट..

वाघोबाची झलक पहायची असेल तर किमान दोन महिने पाहावी लागणार वाट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघोबाची एक झलक पाहण्यासाठी देशभरातील वन्यप्रेमींसह विदेशी पर्यटकही आतूर असतात.मात्र,तुम्ही जर ताडोबातील वाघाचे दर्शन घेण्याचा बेत आखत असाल तर तुम्हाला किमान दोन महिने वाट पाहावी लागेल.कारण,फेब्रुवारीपर्यंतचे जंगल सफारीचे बुकिंग फुल्ल झाले आहे.मार्चमध्येच तुमचे ‘वेटिंग’ संपणार असून,त्यानंतर व्याघ्रदर्शनाचा मुहूर्त असणार आहे.
ताडोबाची जंगल सफारी केली की हमखास वाघ पाहायला मिळतोच.यामुळेच वन्यजीव प्रेमींसह पर्यटकांचा ओढा ताडोब्याकडे वाढला आहे.ताडोबा परिसरात राहण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देणारे रिसॉर्ट या सोयींमुळे पर्यटकांची सर्वकाळ ताडोब्याला पसंती असते.सध्याच्या स्थितीत तर ताडोबासाठी जंगल सफारीचे बुकिंग मिळणे कठीण झाले आहे.येथील मोहर्ली,नवेगाव,कोलारा व पांगडी-झरी हे सर्व गेट (कोअर झोन) फेब्रुवारीपर्यंत हाऊसफुल्ल आहेत.मोहर्ली गेटवर मार्चनंतरही फक्त १० ते १५ टक्केच बुकिंग आहेत.नवेगाव गेटवर तर त्यापेक्षाही कमी फेऱ्या शिल्लक आहेत.त्यामुळे वेट अँड वाचची भूमिका असणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!