Thursday, August 27, 2026
Homeनागपूररेल्वेत बसतांना अपघात घडल्यास नुकसानभरपाई- प्रवाशाने स्वतःहून अपघात घडवला आधी सिद्ध करा..-...

रेल्वेत बसतांना अपघात घडल्यास नुकसानभरपाई- प्रवाशाने स्वतःहून अपघात घडवला आधी सिद्ध करा..- मुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंपीठाने दिला निर्णय….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर:- एका महिला प्रवाशाचा चालत्या रेल्वेत बसतांना खाली पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास नकार दिला होता.रेल्वे कायद्यानुसार ही दुर्दैवी घटना नाही.प्रवाशाने स्वतःहून अपघात करून घेतला.त्यामुळे रेल्वे भरपाई देण्यास जबाबदार नाही;असा दावा न्यायालयात करण्यात आला होता.न्यायालयाने हे मुद्दे बेकायदेशीर ठरविले.प्रवाशाने स्वतःहून अपघात करून घेतला हे मान्य करण्यासाठी प्रवाशाचा तसा उद्देश होता; हे आधी सिद्ध करणे आवश्यक आहे.प्रकरणातील प्रवाशाने आत्महत्या केली.असे रेल्वेचे म्हणणे नाही. 

 त्यामुळे अशा प्रकरणांत रेल्वेची काहिही चूक नसली तरी मृताच्या वारसदारांना भरपाई देणे बंधनकारक के आहे,असे न्यायालयाने सांगितले.  दीपलक्ष्मी बांधे (50) असे मृत प्रवाशाचे नाव होते.त्या नागपूर येथील रहिवाशी होत्या. न्यायालयाने त्यांच्या वारसदारांना ८ लाख रुपये भरपाई मंजुर केली आहे.

रेल्वे तिकिटाचा मुद्दाही खारीज 

प्रवासी महिलेकडे रेल्वेचे तिकीट नव्हते.त्यामुळे तिचे वारसदार भरपाईसाठी अपात्र आहेत, असा मुद्दा देखील रेल्वेने उपस्थित केला होता.न्यायालयाने तो मुद्दाही खारीज केला.केवळ रेल्वे तिकीट मिळाले नाही म्हणून प्रवासी तिकिटाशिवाय रेल्वे प्रवास करीत होती, असे म्हणता येणार नाही.अपघातानंतर तिकीट हरवले जाऊ शकते,याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

17 वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानकावर घडली घटना

ही घटना 17 वर्षांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानक येथे घडली. प्रवासी महिलेला 12 फेब्रुवारी 2006 रोजी अमरावती-नागपूर पॅसेंजरने वर्धा येथून नागपूरला यायचे होते. त्या फलाटावर पोहोचण्यापूर्वीच रेल्वे चालायला लागली. त्यामुळे त्या पुलावरून धावत येऊन रेल्वेत बसताना खाली कोसळल्या व रेल्वेखाली आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

कायद्यात दुर्दैवी घटनेची व्याख्या

रेल्वे कायद्यातील कलम १२३ (सी) मध्ये दुर्दैवी घटनेची व्याख्या देण्यात आली आहे.त्यानुसार, प्रवासी रेल्वेत, रेल्वे प्रतीक्षा कक्षात, आरक्षण व बुकिंग कार्यालयात.फलाटावर किंवा इतर रेल्वे परिसरात दहशतवादी घातपात घडणे. हिसक हल्ला घडणे, दरोडा पडणे, दंगल, गोळीबार, जाळपोळ होणे किंवा रेल्वेतून प्रवासी खाली पडणे या घटना दुर्दैवी घटना आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!