- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे आटोपल्याने शेतकरी दरवर्षी पेरणीची घाई करतात.पण,यंदाच्या हंगामात अल-निनोचा प्रभाव दिसून येत असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे पेरणी करतांना शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय तसेच जोपर्यंत किमान शंभर मिलिमीटर पाऊस पडत नाही,तोपर्यंत पेरणी करू नये,अशा सूचना कृषी विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.त्याचबरोबर,बियाणे खरेदी करतांना अधिकृत वितरक किंवा विक्रेते यांच्याकडूनच खरेदी करावे.सोबतच बियाणे खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून पक्क्या बिलाचा आग्रह करावा.पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणक्षमता तपासणी करावी.बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये,असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.रासायनिक खतांचा पुरेसा साठा असल्यामुळे कोणत्याही अफवेला बळी पडू नये. आवश्यकतेनुसारच खतांची खरेदी करावी.थोड्या प्रमाणात डीएपी खताच्या पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत.अशावेळी शेतकऱ्यांनी डीएपी खताच्या एका बॅगला पर्याय असलेल्या खतांचा वापर करावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.डीएपीच्या पर्यायामध्ये एक बॅग डीएपी,अर्धी बॅग युरिया,तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट किंवा एक बॅग डीएपी,अर्धी बॅग युरिया आणि एक बॅग ट्रिपल सुपर फॉस्फेट(टीएसपी)वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
- Advertisement -

