Wednesday, April 15, 2026
Homeभंडाराभीषण कार अपघातात तरुणाचा मृत्यू; चार मित्र गंभीर..

भीषण कार अपघातात तरुणाचा मृत्यू; चार मित्र गंभीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बेला गावाजळ कारचा भीषण अपघात होऊन अपघातात एका २२ वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर त्याचे चार मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना आज, मंगळवार १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सोनू उर्फ चंद्रकांत डोंगरे वय २२ वर्षे,रा.अड्याळ, ता.पवनी,जि.भंडारा असे अपघात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.तर जखमींमध्ये साजीद मुस्तफा पठाण वय १८ वर्षे,रा.अड्याळ,क्रिश भिवाजी जिभकाटे वय १९ वर्षे,रा. चिचाळ,अभिषेक दीपक बन्सोड वय ३० वर्षे,रा.तिर्री व आयुष भास्कर कावळे वय २४ वर्षे,रा.तिर्री यांचा समावेश आहे.
पाचही तरुण काल,सोमवार १३ एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नागपूरला कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. रात्रभर कार्यक्रम पाहून नागपूरहून गावाकडे परत येत असतांना भंडारा पोलिस स्टेशन हद्दीतील बेला गावाजवळ त्यांची कार अनियंत्रित झाली आणि अनियंत्रीत कार झाडावर आदळून पलटी झाली.यात सोनू डोंगरे हा जागीच मृत पावला.सोनू हा पाच बहिणींमध्ये एकुलता एक होता.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून डोंगरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!