- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात आला.राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून,दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.मुलींनी बाजी मारत ९३.१५ टक्के उत्तीर्णता मिळवली,तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला.गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे २.०९ टक्क्यांची घट झाली आहे.शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा ९६.४४ टक्क्यांसह अव्वल ठरली.वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के,तर कला शाखेचा निकाल ७८.०२ टक्के लागला आहे.विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे,तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८४.१४ टक्के आहे. राज्यातील ९ विभागात एकूण १४ लाख ३३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.यातील १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली.
- विभागनिहाय निकाल👇
- पुणे- ९१.२५ टक्के
- नागपूर- ८८.६७ टक्के
- अमरावती- ९०.९२ टक्के
- मुंबई- ९०.०८ टक्के
- कोकण- ९४.१४ टक्के
- नाशिक- ९०.७२ टक्के
- लातूर- ८४.१४ टक्के
- छत्रपती संभाजीनगर- ८८.६८ टक्के
- कोल्हापूर- ८९.९७ टक्के
खालील अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार असून निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)आणि आईचे नाव(Mother’s First Name)साईटमध्ये दिलेल्या रकान्यात टाकून रिझल्ट पाहता येईल.
- Advertisement -

