Wednesday, June 17, 2026
Homeपुणेबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात आला.राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून,दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.मुलींनी बाजी मारत ९३.१५ टक्के उत्तीर्णता मिळवली,तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला.गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे २.०९ टक्क्यांची घट झाली आहे.शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा ९६.४४ टक्क्यांसह अव्वल ठरली.वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के,तर कला शाखेचा निकाल ७८.०२ टक्के लागला आहे.विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे,तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८४.१४ टक्के आहे. राज्यातील ९ विभागात एकूण १४ लाख ३३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.यातील १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली.
  •  विभागनिहाय निकाल👇
  • पुणे- ९१.२५ टक्के
  • नागपूर- ८८.६७ टक्के
  • अमरावती- ९०.९२ टक्के
  • मुंबई- ९०.०८ टक्के
  • कोकण- ९४.१४ टक्के
  • नाशिक- ९०.७२ टक्के
  •  लातूर- ८४.१४ टक्के
  • छत्रपती संभाजीनगर- ८८.६८ टक्के
  • कोल्हापूर- ८९.९७ टक्के
खालील अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार असून निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number)आणि आईचे नाव(Mother’s First Name)साईटमध्ये दिलेल्या रकान्यात टाकून रिझल्ट पाहता येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १८ जून...

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे...

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित...

आता एमआरपीपेक्षा अधिक दराने खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह परवाना रद्द करण्याची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे,खते व कीटकनाशके वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत,तसेच बोगस बियाणे विक्री,साठेबाजी आणि जादा दराने खतविक्रीच्या प्रकारांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!