Thursday, April 16, 2026
Homeबीडपोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..!

पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड:-राज्याच्या विविध भागात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे.अश्याच प्रकारे बीड जिल्हा पोलीस दलाच्या १७४ जागांसाठी आज,बुधवार ११ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.दीपक भास्कर वावळ वय २६ वर्षे,रा.ता.परळी,जि.बीड असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
सध्या बीडमध्ये पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे.आज बुधवारी पहाटे ५ वाजेपासून जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेची धामधूम सुरू होती.दीपकने दुपारी साडेबाराच्या सुमारास १६०० मीटर धावण्याची शारीरिक चाचणी पूर्ण केली.मात्र,धाव पूर्ण होताच त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला.मैदानावर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच वैद्यकीय पथकाने तातडीने दीपकला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र,रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती खालावली.रुग्णालयात पोहचताच तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मृत दीपक वावळ हा परळी तालुक्यातील रहिवासी होता.पोलिस भरतीसाठी तो बीडमध्ये आला होता.दीपक गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होता.आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी आणि देशसेवेसाठी त्याने हे ध्येय समोर ठेवले होते.मैदानावर तो आत्मविश्वासाने उतरला होता,मात्र धाव संपल्यानंतर त्याच्या आयुष्याची शर्यतच संपल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!