- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील जुलै महिन्यात थांबा देत बरसलेल्या मुसळधार पावसाने सर्वांना आनंदित करून सोडले होते.अश्यातच आता पावसाने दडी मारल्याने सर्वांनाच घामाघूम करून सोडले आहे. पाऊस बरसत नसल्याने उकाडा वाढला आहे.वाढलेल्या उकाड्यामुळे शेतातील बांध्यांतील पाणी सुकल्यामुळे रोवणीची कामेदेखील प्रभावित झाली आहेत.जुलै महिन्यात अधूनमधून बरसणाऱ्या संततधार पावसामुळे गारवा वाढून पारा घसरू लागला होता.त्यामुळे थंडावा जाणवत होता.मात्र,गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे.अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असून, दमदार पाऊस नसल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे.मात्र,पावसाने दडी मारताच उकाडा वाढला आहे.अचानक वातावरणात होत असलेल्या या बदलामुळे आरोग्यावर विपरित परिणाम जाणवत आहेत.विशेष म्हणजे, लहान मुले व वृद्धांना याचा अधिकच त्रास होत आहे.अनेक जिल्ह्यांत अल्प पावसामुळे पिके कोमेजण्याच्या मार्गावर असतांनाच आगामी दोन आठवडे पाऊस उसंत घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांवर संकट ओढावले आहे.आत दमदार पाऊस बरसला नाही,तर खरीप हंगामावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झालेला दिसून येतो.
- Advertisement -

