Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदोन हजारांच्या नोटांचा थांग पत्ताच लागेना..!- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार २१४.२०...

दोन हजारांच्या नोटांचा थांग पत्ताच लागेना..!- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार २१४.२० कोटी नोटा चलनात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नोटबंदी जाहीर केली.त्यानुसार चलनातील ५०० व १,००० रुपयांच्या नोटा चलन बाह्य झाल्या व त्यानंतर २,००० हजाराची व इतर नोटा चलनात आल्या.इतर नोटा अजूनही चलनात तर आहेतच; मात्र दोन हजारांची नोट कुठे गायब झाली याचा थांगपत्ताच लागत नसल्याने सदर बाब नवलाची ठरली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२२ रोजीच्या आकडेवारीवरुन, २,००० रुपयांच्या एकूण २१४.२० कोटी नोटा चलनात आहेत. एकूण चलनाचा हा आकडा १.६% आहे.त्यांचे मूल्य ४,२८,३९४ कोटी रुपये आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा असूनही त्या मात्र व्यवहारातून कां गायब झाल्या, हा खरा प्रश्न आहे.

जर कां,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच चलनातील नोटांची जाण नसेल तर जनता-जनार्दन यांनी कुणावर विश्वास ठेवावा? व चलनातील एवढ्या मोठ्या नोटा गेल्या कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.देश हा डॉ. बाबा साहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारावर खरोखरच चालतो की काय? अशी परिस्थिती हल्ली निर्माण झाली आहे.’चलनातील दोन हजारांच्या नोटांनी बांधलाय फेटा’ असे विदारक चित्र दिसून येत आहे.यांस जबाबदार कोण? एकीकडे बँकांची बँक म्हणते की मोठ्या प्रमाणावर नोटा तर आहेत मात्र त्या गायब झाल्या कश्या व कुठे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!