Monday, May 25, 2026
Homeमुंबईदोन वेळच्या अन्नाची कशीतरी सोय करतात; तेही माणसच आहेत…मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय;...

दोन वेळच्या अन्नाची कशीतरी सोय करतात; तेही माणसच आहेत…मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; फुटपाथ वर राहणाऱ्या लोकांना दिलासा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -


उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आजही हजारो लोक रस्त्यांवर,फुटपाथ किंवा उघड्यावर राहत आहेत.दोन वेळच्या अन्नाची कशीतरी सोय करणाऱ्या या लोकांकडे घर भाड्यानेही घेण्याची परिस्थिती नाही.अशा हजारो लोकांचा विचार करणारा निर्णय मुंबई हायकोर्टाने आज ३ मार्च रोजी दिला.दक्षिण मुंबईतील फूटपाथवर राहणाऱ्या रहिवाशांना हटवण्याचे निर्देश देणारा कोणताही आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.लोकांचे बेघर होणे ही जागतिक समस्या असून फूटपाथवर राहणारे लोकही इतर लोकांप्रमाणेच माणुस असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.शहरातील फूटपाथ आणि पदपथांवर अनधिकृत विक्रेते आणि फेरीवाले यांचा कब्जा असल्याच्या मुद्द्यावर हायकोर्टाने दाखल केलेल्या सुओ मोटू याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
न्यायमूर्ती पटेल म्हणाले, “ते (बेघर लोक) देखील माणसं आहेत. ते गरीब किंवा कमी भाग्यवान असू शकतात,परंतु ते देखील माणसे आहेत आणि ते न्यायालयाच्या दृष्टीने इतर माणसांप्रमाणेच मानव आहेत.” फूटपाथ आणि रुळांवर राहणाऱ्या अशा व्यक्तींसाठी रात्रीच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी सूचना असोसिएशनचे वकील मिलिंद साठे यांनी केली.हा एक उपाय आहे.ज्याचा अधिकारी विचार करू शकतात,असे खंडपीठाने म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!