Wednesday, September 9, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज पोलिसांनी तालुक्यातील नागरिकांच्या हरविलेल्या तब्बल २५ मोबाईलचा शोध घेऊन आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी मूळ मालकांना परत केले.विशेष म्हणजे,मोबाईलमध्ये नागरिकांची वैयक्तिक माहिती,बँकिंग व्यवहार,कागदपत्रे आणि महत्त्वाचा डेटा साठवलेला असतो.त्यामुळे मोबाईल हरविल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण  होते.अशावेळी देसाईगंज पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संबंधित मोबाईल धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देसाईगंज तालुक्यातील बऱ्याच नागरिकांचे मोबाईल फोन हरवले होते.त्यानुसार,नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणांची गंभीर दखल घेत तांत्रिक तपासाला सुरुवात केली. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकांचा मागोवा घेत विविध ठिकाणी त्यांचे लोकेशन शोधण्यात आले.पोलिसांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा,तांत्रिक विश्लेषण आणि सायबर यंत्रणेच्या मदतीने हे मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देतांना देसाईगंज पोलिसांनी सर्व
आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली व २५ हरविलेले मोबाईल फोन मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.सदरची कार्यवाही कुरखेडा उपविभागिय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक स्वप्निल इजप्पवार यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गोडबोले,पोलीस पथक तथा अंमलदार शैलेश तोरपकवार यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!