- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देशातील वर्तमान स्थिती बघता बहुजनांचे अधिकार फक्त काँग्रेस पक्षच अबाधित राखु शकते; हा विश्वास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देसाईगंज तालुका युवक काँग्रेसच्या वतिने “चलो पंचायत,चलो वार्ड”अभियान राबविण्यात येणार असून काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात पोहचवण्यासाठी युवक काँग्रेस सक्रिय झाली आहे.
या संदर्भात देसाईगंज येथील शासकीय विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या देसाईगंज तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दरम्यान आवश्यक बाबीची पुर्तता करण्यासंदर्भातही नियोजन करण्यात आले असून तालुक्यात युवक काँग्रेसचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.यावेळी माजी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष लॉरेन्स गेडाम,विधानसभा अध्यक्ष अक्षय भोवते, देसाईगंज तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पंकज चहांदे,आरमोरी विधानसभा काँग्रेस कार्यकर्त्या डॉ.शिलु चिमूरकर,युवक काँग्रेसचे युवा नेता पिंकू बावणे,देसाईगंज नगर परिषदेचे माजी नगरसेवक हरीश मोटवानी,तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष देवनाथ सयाम,मच्छिंद्र मातेरे,अमर भर्रे,तालुका सचिव आक्रोश शेंडे,संघटक राजेंद्र तूपट, कोषाध्यक्ष विजय चंडिकार,शहर उपाध्यक्ष विजय पिल्लेवान,ओमकार कामथे, मनोज दोनाडकर,ओमराज हारगुळे,नरेश जौंजाळकर, आशिष पारधी,रोशन नहाले, विकास पारधी,ज्ञानेश्वर वझाडे, विनोद तोंडफोडे, भूमेश्वर शिंगाडे,सुनील राऊत,मनोज दोनाडकर,अरविंद दुफारे, दिलीप गुरनूले,पुरुषोत्तम मोहुर्ले,अविनाश अनोले, विक्रम राऊत,अक्षय दामले, किरण अवसरे,कुंदन बोदेले आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisement -

