Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततिसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक; वीज कोसळून मृत्यू झाल्यास १० लाखाची मदत देण्याची...

तिसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक; वीज कोसळून मृत्यू झाल्यास १० लाखाची मदत देण्याची मागणी.. -अधिवेशनातील तारांकित प्रश्नात विजय वडेट्टीवारांनी मुद्दा केला उपस्थित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा शेतमजुरांच्या मृत्यू प्रकरणी १० लाख रुपयांची मदत द्यावी,अशी मागणी केली आहे.वाघाने हल्ला केल्यावर २५ लाख रुपयांची मदत केली जाते.तर वीज कोसळून मृत्यू झाल्यास भरपाई म्हणून केवळ चार लाख रुपयांची मदत केली जाते.ही मदत पुरेशी नसल्याने या मदतीची रक्कम वाढवावी,असे विजय वडेट्टीवार यांनी आज,बुधवार २ जुलै रोजी सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात म्हटले आहे.

राज्यात सोमवार ३० जून पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले.या अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल,मंगळवारी विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले होते.त्यामुळे काँग्रेसचे नाना पटोले यांचे एका दिवसासाठी निलंबनदेखील करण्यात आले होते.त्यानंतर आज बुधवारी पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले. राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात.जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू होतो,तेव्हा त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते.अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते आहे.पण ही मदत वाढवून १० लाखांची करावी,अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.महाराष्ट्रात वीज पडून वर्ष २०२२ मध्ये २३६ मृत्यू झाले आहेत तर वर्ष २०२३ मध्ये १८१ इतकी मनुष्यहानी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.त्यामुळे वीज पडून मृत्यू झालेले शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबाला १० लाख इतकी मदत द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केल्यानंतर यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापनामध्ये आधी वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता.पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे,असे सांगितले.तसेच या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबत आपल्या सूचनांचा विचार करू आणि याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे मंत्री महाजन यांनी म्हटले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!