- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि ‘रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’ अर्थात ‘रॉ’ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष वन्यजीव रुग्णवाहिकेद्वारे तब्बल आठशे किलोमीटरहून अधिक प्रवास करून या कासवांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुरक्षित पोहोचवले.वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक विश्रांतीनंतर त्यांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली.यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील पळसगाव,ताडोबा, पांढरपवणी आणि जामणी येथे सोडण्यात आले.या पुनर्वसन मोहिमेत कासवांना केवळ जंगलात सोडण्यापुरती प्रक्रिया मर्यादित ठेवण्यात आलेली नाही.तर भविष्यात या प्रजातीची नैसर्गिकरित्या वाढ होऊन टिकाऊ लोकसंख्या निर्माण व्हावी,यासाठी नर आणि मादी कासवांच्या प्रमाणाचाही विचार करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,ही कासवे मुंबई आणि ठाणे परिसरातील अवैध वन्यजीव तस्करीविरोधी कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली होती.पुनर्वसन मोहिमेसोबतच महाराष्ट्रात ‘प्रोजेक्ट स्ट्राइप्स'(Project STRIPES)या विशेष उपक्रमाचा प्रारंभ झाला आहे. भारतीय तारांकित कासवांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते.अशा पार्श्वभूमीवर जप्त वन्यप्राण्यांची केवळ देखभाल न करता त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने पुनर्वसन करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात परतविण्याच्या दृष्टीने ‘प्रोजेक्ट स्ट्राइप्स’ महत्त्वाचा ठरणार आहे.
- Advertisement -

