उद्रेक न्युज वृत्त :-चालत्या बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील ४० प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.पाहता-पाहता काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.बस वाहन चालकच्या समयसूचकतेने सुदैवाने जीवितहानी टळली.सदरची घटना आज,सोमवारी ७ एप्रिलला दुपारी ४ वाजेच्या सुमारास हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील औंढा नागनाथ ते वसमत मार्गावरील वगरवाडी शिवारात घडली.कर्नाटक राज्यातून एक बस सुमारे ४० भाविकांना घेऊन औंढा नागनाथच्या दिशेने येत होती.सदर बसमध्ये भाविकांसह त्यांच्यासाठी भोजन तयार करण्याचे साहित्यही होते.दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सदर बस वसमतकडून औंढा नागनाथकडे येत होती.यावेळी वगरवाडी शिवारात बसच्या पाठीमागील भागातून अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे तातडीने बस थांबवून भाविकांना खाली उतरविले.यावेळी परिसरातील नागरीक त्यांच्या मदतीसाठी धावले.त्यांनी वाहनातील सर्व प्रवाशांना खाली उतरविले व काही साहित्यही बाहेर काढले.सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
चालत्या बसने अचानक घेतला पेट; आगीचे रौद्ररुप धारण..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

