Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना; ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.....

चंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना; ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.. – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज,मंगळवार ३ मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण पहावयास मिळणार आहे.या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि काही माध्यमांमधून नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचे काम तसेच अंधश्रध्देला खतपाणी घातले जात असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने(अंनिस)ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही,असे असतांना देखील राष्ट्रीय वाहिन्या आणि सोशल मिडियावर सातत्याने ग्रहण विषयी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. एका बाजूला चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणारा आपला देश अजून ग्रहणासंबंधी अंधश्रद्धांना बळी पडतो आहे.त्यामुळे,ग्रहणाबाबत अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात,डॉ.हमीद दाभोलकर,मिलिंद देशमुख,नंदिनीं जाधव,रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर अण्णा कडलास्कर,डॉ.अशोक कदम, मुंजाजी कांबळे,प्रकाश घादगिने,मुक्ता दाभोलकर,फारुख गवंडी प्रवीण देशमुख आदींनी केली आहे.चंद्रग्रहण ही एक साधी खगोलीय घटना आहे.त्यामध्ये कोणतीही नवीन ऊर्जा किंवा किरणे तयार होत नसतात.दर सहा महिन्यानंतर पृथ्वी,चंद्र आणि सूर्य यांच्या समान पातळीमध्ये आल्यानंतर होणारा सावल्यांचा हा खेळ किंवा परिणाम असतो. तरीही अन्न सेवन करणे असेल, बाहेर फिरणे असेल किंवा कोणतेही दैनंदिन व्यवहार करणे असेल उदाहरणार्थ भाजी चिरणे कात्री वापरणे हे सर्व करीत राहण्यास कोणतीही अडचण नसते किंवा त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसतो.गर्भवती स्त्रीने झोपले किंवा पाय क्रॉस करून बसले किंवा चाकू कात्री वापरली असे काहीही केले तरीही गर्भावर यत्किंचितही दुष्परिणाम होत नसतो हे लक्षात घ्यावे; असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!