Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तग्रामपंचायतीचा अनोखा ठराव; लग्नसमारंभात डीजे आणि दारूला 'नो' म्हणणाऱ्या कुटुंबास २१ हजाराचे...

ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव; लग्नसमारंभात डीजे आणि दारूला ‘नो’ म्हणणाऱ्या कुटुंबास २१ हजाराचे बक्षीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लग्न समारंभ म्हटले तर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर डीजे आणि दारूचा महापूर पहावयास मिळतो.सध्या स्थितीत काही जणांना दारू ढोसल्याशिवाय डीजेत थिरकताच येईना..! असे झाले आहे.अशातच भंग-भंग आवाज आणि नाचता-नाचता होणारा दंगा,यामुळे भांडणे वाढून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.अश्या अवस्थेत ग्रामस्थांना बऱ्याचदा नुकसानीस सामोरे जावे लागते.त्यामुळे गावचे हित जोपासणे आवश्यक असल्याने गावच्या हितावह कार्य करण्याच्या दृष्टीने
पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील एका गावातील ग्रामपंचायतीने एक अनोखा निर्णय घेतला आहे. भटिंडा जिल्ह्यातील बल्लो गावातील ग्रामपंचायतीने लग्नसमारंभात डीजे न वाजवणाऱ्या आणि दारूची विक्री न करता दारू न देणाऱ्या कुटुंबाला २१ हजार रुपये रोख देण्याची घोषणा केली आहे.सदरची रक्कम पंचायत त्या कुटुंबाला प्रोत्साहन म्हणून देईल.गावाच्या हितासाठी आणि व्यसनमुक्तीची मोहीम म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.बल्लो गावच्या सरपंच अमरजीत कौर यांनी म्हटले की,गावकऱ्यांनी लग्न समारंभांवर अनावश्यक खर्च करू नये आणि मद्यपानाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच साधारणपणे असे दिसून येते की, गावांमध्ये दारू दिली जाते आणि डीजे (डिस्क जॉकी) द्वारे मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात.त्यामुळे भांडणे होतात,असे अमरजीत कौर म्हणाल्या.याचबरोबर,मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत असल्याचे सरपंच अमरजीत कौर यांनी सांगितले.त्या म्हणाल्या की,लग्न समारंभात व्यर्थ खर्च करू नये; यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करू इच्छितो.तसेच,पंचायतीने अश्या प्रकारचा ठरावही केला आहे, ज्यानुसार जर एखाद्या कुटुंबाने दारू दिली नाही आणि लग्न समारंभात डीजे वाजवला नाही तर त्याला २१ हजार रुपये दिले जातील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!