- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली होती.डिसेंबरमध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवले होते.या प्राण्यांचा मृत्यू एच-५एन-१(बर्ड फ्ल्यू) विषाणूमुळे झाल्याचा अहवाल राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानने दिला.तीनही वाघ तीन ते चार वर्षाचे होते.तर बिबट्या ७ ते ८ महिन्यांचा होता.वनमंत्री गणेश नाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघांना उपचारासाठी आणण्यात आले होते.हे तीनही वाघ मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांमुळे बंदीस्त करण्यात आले होते. वाघ डिसेंबर २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपूरातील टीटीसीतून, तर बिबट बुलढाण्यातून मे २०२४ मध्ये आला होता; पण उपचारादरम्यान तीन वाघ आणि एका बिबट्याचा २० ते २३ डिसेंबरदरम्यान मृत्यू झाला.वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवण्यात आले. प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या चाचणीचा अहवाल १ जानेवारी २०२५ रोजी समोर आला होता.वाघ आणि बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे या अहवालात म्हटले होते.
- Advertisement -

