Wednesday, April 15, 2026
Homeनागपूर'त्या' तीन वाघांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू चिकन खाल्ल्यानेच..

‘त्या’ तीन वाघांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू चिकन खाल्ल्यानेच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली होती.डिसेंबरमध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवले होते.या प्राण्यांचा मृत्यू एच-५एन-१(बर्ड फ्ल्यू) विषाणूमुळे झाल्याचा अहवाल राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानने दिला.तीनही वाघ तीन ते चार वर्षाचे होते.तर बिबट्या ७ ते ८ महिन्यांचा होता.वनमंत्री गणेश नाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघांना उपचारासाठी आणण्यात आले होते.हे तीनही वाघ मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांमुळे बंदीस्त करण्यात आले होते. वाघ डिसेंबर २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपूरातील टीटीसीतून, तर बिबट बुलढाण्यातून मे २०२४ मध्ये आला होता; पण उपचारादरम्यान तीन वाघ आणि एका बिबट्याचा २० ते २३ डिसेंबरदरम्यान मृत्यू झाला.वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवण्यात आले. प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या चाचणीचा अहवाल १ जानेवारी २०२५ रोजी समोर आला होता.वाघ आणि बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे या अहवालात म्हटले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!