Sunday, April 19, 2026
Homeनागपूरखाते वाटप मंत्रीमंडळात भाजपचाच पलडा भारी..!

खाते वाटप मंत्रीमंडळात भाजपचाच पलडा भारी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-हिवाळी अधिवेशन आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले.राजभवनात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्याप्रमाणे भाजपचा वरचष्मा होता,त्याच पद्धतीने आता खाते वाटपात देखील भाजपचे वर्चस्व महत्त्वाच्या खात्यांवर दिसून येत आहे.फारशी नाराजी न दाखविता अर्थ खाते राखण्यात अजितदादा यशस्वी ठरले तर एकनाथ शिंदे यांना आता नगर विकासवरच समाधान मानावे लागणार आहे.गृह,महसूल,ऊर्जा,आदिवासी विकास, अन्न व नागरी पुरवठा,जलसंधारण, पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण,माहिती तंत्रज्ञान,माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक आरोग्य,सामाजिक न्याय, कामगार,गृह (ग्रामीण),गृहनिर्माण,मत्स्य विभाग बंदरे अशी महत्त्वाची खाती भाजपने आपल्याकडेच ठेवली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यावेळी प्रमाणे अर्थ,अन्न व औषधी प्रशासन,महिला बालविकास,वैद्यकीय शिक्षण ही खाती आहेत.याचवेळी शिवसेनेकडे नगर विकास, शालेय शिक्षण,माती व पाणी परीक्षण,अर्थ नियोजन, गृह (शहर) राज्यमंत्रीपद अशी खाती आहेत.एकंदरीत सर्वाधिक आमदार असल्याने भाजप सहयोगी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा यावेळी अधिक आक्रमकपणे,स्वबळावर पुढे जाण्याच्या पावित्रात दिसत आहे.यामुळेच राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिले दोन दिवस राजी-नाराजी पहायला मिळाली. नेमकी तीच बाब टाळण्यासाठी आता अधिवेशन संपल्यानंतर सावधपणे खातेवाटप जाहीर करण्यात आले.त्यातच सर्व बाबींचा विचार करता खाते वाटप मंत्रीमंडळात यावेळी भाजपचाच पलडा भारी असल्याचे दिसून येत आहे; असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!