- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-खताच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आला असुन सद्या कृषी केन्द्रांमार्फत युरिया खताचा काळाबाजार सुरु आहे.या भ्रष्टाचारावर लगाम घालुन खताच्या किंमती पुर्ववत करा,अश्या मागणीचे निवेदन आज, शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देसाईगंज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
खताची एक बॅग १ हजार ३५० वरुन सरसकट २ हजार २०० रुपये करण्यात आली.महागाई व वाढत्या मजुरीच्या दरांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.असे असतांना युरिया खताचे शासकिय मुल्य २६७ रुपये असतांना कृषी केन्द्र चालक प्रती बॅग ३३० ते ३५० रुपयाला विक्री करुन शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करतात.ही बाब योग्य नसुन यावर आळा घालण्यासाठी शासनाने रासायनिक खताचे दर पुर्ववत करुन युरिया खताचा काळाबाजार थांबवावा, या आशयाचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देसाईगंजच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर यांचे मार्फतीने सादर केले.
- वंचितच्या आवाजाला बहुजन समाज पक्षाची साथ👇
शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने चांगले पाऊल उचलत भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आवाज उठवला.या लोकोपयोगी निवेदनाचे बहुजन समाज पक्षाच्या वतीने समर्थन करण्यात आले.या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम,तालुकाध्यक्ष विनोद मेश्राम,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भीमराव शेन्डे,शहर अध्यक्ष प्रा.अशोक मेश्राम,शिवदास बन्सोड,खुशाल मेश्राम,दिलिप बन्सोड, हेमराज मेश्राम,नितेश रामटेके,शिशुपाल वालदे,धनराज मेश्राम,भाग्यवान बन्सोड,भारत मस्के, स्वप्निल मेश्राम यांचेसह बीएसपीचे जिल्हा उपाध्यक्ष जागेश्वर माने, महासचिव विनायक धारगावे,शहर अध्यक्ष आशिष घुटके,कृणाल लांडगे आदी उपस्थित होते.
- Advertisement -

