Tuesday, June 23, 2026
Homeपुणेक्षुल्लकशा कारणासाठी पोटच्या नऊ वर्षीय मुलीची बापानेच केली हत्या..!

क्षुल्लकशा कारणासाठी पोटच्या नऊ वर्षीय मुलीची बापानेच केली हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडली असून क्षुल्लकशा कारणासाठी बापाने पोटच्या नऊ वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक बाब आज मंगळवारी समोर आली आहे.हैवान बाप एवढ्यावरच थांबला नाही तर मुलीची हत्या केल्यानंतर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने  मुलीचे मृतदेह कापडात गुंडाळले व घराला आग लावून अपघात भासवण्याचा प्रयत्न केला.यात प्रत्यक्षदर्शी महिलेचाही समावेश असल्याने दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदरची घटना दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे गावातील हनुमान वस्तीत घडली.शांताराम दुर्योधन चव्हाण वय ३३ वर्षे, रा.हनुमान वस्ती,देऊळगाव राजे, ता.दौंड,जि.पुणे असे हैवान आरोपी पित्याचे नाव आहे, तर अनामिका शांताराम चव्हाण वय ९ वर्षे असे मृतक चिमुकलीचे नाव आहे.
नऊ वर्षीय अनामिकाने तिचा भाऊ संस्कार याच्या गुणपत्रिकेत खाडाखोड केली होती.सदरची बाब तिच्या वडिलांना कळली.याचा राग मनात धरून आरोपी शांतारामने लाकूड कापण्याच्या मशीनने मुलीच्या गळ्यावर,डोक्यावर आणि शरीरावर वार केले.यात मुलीचा जागीच मृत्यू झाला.घटनेवेळी चिंगु शिंदबाद भोसले ही महिला उपस्थित असतांनाही तिने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.अश्यातच आरोपीने घराला आग लावून प्रकरण भटकविण्याचा प्रयत्न केला.प्रकरणी दौंड पोलिसांनी पोलीसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२४ अंतर्गत कलम१०३(१), २३८,३(५)नुसार गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पीएसआय सुनील उगले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!