- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-शासनाच्या सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या विभागाचा निधी अन्य विभागाकडे वळविण्याला तीव्र विरोध दर्शविला होता.मात्र,त्यांच्या विरोधाला केराची टोपली दाखवित राज्य सरकारने हा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळविला आहे.सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नाराज झाल्यानंतर राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर २०२५-२६ या आर्थिक वर्षात १ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज घेणार आहे.त्यातील साधारणतः तीन हजार कोटी रुपये दरमहा लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राज्यात सप्टेंबरपर्यंत महापालिकांसह हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.याशिवाय अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर बहिणी नाराज होऊ नयेत,याची खबरदारी घेतली जाणार आहे.त्यासाठी कर्ज काढून त्यांना हप्ते देण्यात येणार आहेत.दरमहा २५ तारखेपूर्वी लाभ बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे. कोरोनानंतर राज्याने ४ लाख १३ हजार १५६ कोटींचे कर्ज घेतल्याची नोंद अर्थसंकल्पात आहे.२०१५-१६ ते २०२५-२६ या दहा वर्षांत सरकारवर ६ लाख कोटींचे कर्ज वाढले आहे.त्यापोटी सरकारला दरमहा ६१ हजार कोटींपर्यंत व्याज द्यावे लागत असल्याचीही नोंद अर्थसंकल्पात आहे.
- Advertisement -

