Monday, August 31, 2026
Homeनागपूरकंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार प्रत्येकी ८२ लाख रुपये..

कंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार प्रत्येकी ८२ लाख रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील एसबीएल कंपनीत काल,रविवार १ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात कंपनीत काम करणाऱ्या तब्बल १९ कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर अद्याप २३ जण जखमी असून यात १३ जण ७० टक्के भाजल्याने गंभीर जखमी आहेत.अश्यातच आज,सोमवार २ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंपनीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदतीची घोषणा केली आहे.यात मृतांच्या वारसांना कंपनीकडून ७५ लाख रुपये,राज्य सरकारकडून ५ लाख रुपये तर केंद्र सरकारकडून २ लाख रुपये असे एकूण ८२ लाख रुपये मदत दिली जाईल.तर जखमींना २५ लाख रुपये दिले जाणार आहेत.याशिवाय जखमींच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना आखून पुनर्वसन केले जाईल.त्यातच,जोपर्यंत एसबीएल कंपनी जोपर्यंत बंद राहील तोपर्यंत कामगारांना वेतन देण्यात येईल.कंपनी परत सुरू झाल्यानंतर त्यांना कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई  केली जाईल,असे बावनकुळे यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!