Wednesday, April 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तएसटीच्या तिकीट दरात हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय..

एसटीच्या तिकीट दरात हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अर्थात एसटी प्रशासनाने तिकीट दरात हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.सदरची वाढ ही येत्या, मंगळवार १४ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर लागू होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला सणासुदीच्या आणि गर्दीच्या काळात ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे.मात्र,यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी दहा टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.बसस्थानके,बसगाड्या आणि आगार स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रत्येक तिकिटावर २ रुपये स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे.महिला सन्मान योजना,ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारक प्रवाशांनाही हा स्वच्छता अधिभार लागू असेल.त्यामुळे सर्व प्रवाशांवर या वाढीचा परिणाम होणार आहे. ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेअंतर्गत चार आणि सात दिवसांच्या पासवर ५ रुपये अधिभार आकारला जाणार आहे.मात्र,आगाऊ आरक्षणातून घेतलेल्या पासवर हा अधिभार लागू नसेल.तसेच बस भाड्याने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये अधिभार द्यावा लागणार आहे.अश्यातच काही महत्त्वाच्या मार्गावरील नवे तिकिट दर- मुंबई ते पुणे-२८२ वरून ३१४ रुपये तिकीट दर,मुंबई ते नाशिक-३२३ वरून ३५९ रुपये, मुंबई ते कोल्हापूर-७५० वरून आता ८२५ रुपये,
परळ ते कोल्हापूर-६४० वरून ७०४ रुपये,मुंबई ते चिपळूण- ४५३ वरून ५०२ रुपये,मुंबई ते लातूर – ९०० वरून १००० रुपये,मुंबई ते रत्नागिरी- ६०० वरून ७०० रुपये तिकीट दर तर मुंबई ते अलिबाग- १८२ ऐवजी २०४ रुपये.ही भाडेवाढ साधी बस,मिडी बस,जलद सेवा आणि रात्रसेवा देणाऱ्या गाड्यांसाठी लागू असेल.मात्र शिवनेरी,शिवशाही,जनशिवनेरी, हिरकणी,शयनयान आणि ई-बस सेवांना या दार वाढीतून वगळण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!