Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीआज देसाईगंज तालुक्यातील विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑनफिल्ड आढावा.. - देसाईगंज नगर परिषदेच्या पाणीपुरवठा...

आज देसाईगंज तालुक्यातील विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून ऑनफिल्ड आढावा.. – देसाईगंज नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या संथगतीवर नाराजी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,बुधवार ८ एप्रिल रोजी देसाईगंज तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामे,सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक उपजीविका उपक्रमांचा सखोल ऑनफिल्ड आढावा घेतला.या दौऱ्यात पाणीपुरवठा,कृषी,सूक्ष्म अन्नप्रक्रिया तसेच पायाभूत सुविधा यासंबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी यांच्यासोबतच अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे,जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार तसेच उपजिल्हाधिकारी(रोहयो)स्मिता बेलपत्रे यांनीही आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित ठिकाणी भेटी देऊन विविध बाबींची पाहणी करत सर्वंकष आढावा घेतला.
  • पाणीपुरवठा योजनेवर नाराजी👇
देसाईगंज नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे ६० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करतांना कामाच्या संथ गतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.ही योजना निर्धारित वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत कामाला गती देऊन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.नागरिकांना नियमित,सुरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध करण्यासाठी नियोजन अधिक प्रभावी करण्यावरही त्यांनी भर दिला.
  • कृषी प्रकल्पांना प्रोत्साहन👇
कृषी क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शेडनेट व पॉलीहाऊस प्रकल्पांना भेट दिली.विविध कृषी योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीद्वारे तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चातून उभारलेल्या रोपवाटिका पॉलीहाऊसची त्यांनी पाहणी केली.आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन व उत्पन्न वाढविण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
  • सूक्ष्म अन्नप्रक्रिया व स्थानिक उपक्रमांची पाहणी👇
सावंगी येथील डाळ मिलला भेट देत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत सुरू असलेल्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उपक्रमाची पाहणी केली.ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी अशा उपक्रमांना चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर विसोरा येथील एसआरपीएफ कॅम्पला भेट देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट करण्याबाबत चर्चा केली व जवानांच्या सुविधा व कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली.
दौऱ्यात त्यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सुरू असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन पार्कच्या कामाची पाहणी केली.तसेच तलाठी दफ्तार, शाळा व इतर विकासकामांचीही पाहणी करण्यात आली.स्थानिक प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख राहण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या दौऱ्यात देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान,तहसीलदार प्रिती डुडुलकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!