- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जाहीर केला होता.अश्यातच मागील दोन दिवसांपासून वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली असून भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्याचे तापमान ४३-४५°से.पर्यंत जाण्याची शक्यता आहे.सदरची परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते.उष्मालाटेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष वान्मथी सी.यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळामधील विद्यार्थ्यांकरिता उद्या गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे.

- Advertisement -

