Monday, June 15, 2026
Homeनागपूरउद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.त्यानुसार उद्या,मंगळवार १६ जूनपासून राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याने संपामुळे राज्यातील वाहन परवाने,गाड्यांचे पासिंग,आरसी बुक यांसह आरटीओ कार्यालयातील बहुतांश सर्वच कामे ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आरटीओ म्हणजेच मोटार वाहन विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे उलटून गेली आहेत.तरीही अद्याप सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आलेले नाहीत.नियम तयार नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर पदोन्नती मिळत नाही.यामुळे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे.असा आरोप संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.संपाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी नुकतीच संघटनेची एक तातडीची आणि महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीत सर्व पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या या केवळ प्रशासन स्तरावर सहज सुटू शकतात,मात्र वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.बैठकीअंती आता बेमुदत संपाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे सदरचा संप पुकारण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

विदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील ११ जिल्हे वगळता आज,सोमवार १५ जूनपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी...

देशाची राजनीती लक्षात घेऊनच आरपीआय आपली भुमिका ठरवीत असते- प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशाची राजनीती लक्षात घेऊनच आरपीआय आपली राजकीय भुमिका ठरवीत असते,कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची बांधिलकी रिपब्लिकन पक्षाची आहे.त्यामुळे राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!