- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.त्यानुसार उद्या,मंगळवार १६ जूनपासून राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याने संपामुळे राज्यातील वाहन परवाने,गाड्यांचे पासिंग,आरसी बुक यांसह आरटीओ कार्यालयातील बहुतांश सर्वच कामे ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आरटीओ म्हणजेच मोटार वाहन विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे उलटून गेली आहेत.तरीही अद्याप सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आलेले नाहीत.नियम तयार नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर पदोन्नती मिळत नाही.यामुळे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे.असा आरोप संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.संपाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी नुकतीच संघटनेची एक तातडीची आणि महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीत सर्व पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या या केवळ प्रशासन स्तरावर सहज सुटू शकतात,मात्र वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.बैठकीअंती आता बेमुदत संपाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे सदरचा संप पुकारण्यात आला आहे.
- Advertisement -

